
सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या – सांगली विधानसभा क्षेत्र परिसरातील बऱ्याच गांवामधून शहरातील महाविद्यालयास विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने येत आहे. सांगली विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली.


श्री. प्रदीप कांबळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, बिसुर, खोतवाडी, वाजेगाव, नांद्रे, नावरसवाडी, कर्नाळ, पद्माळ, बुधगाव, माधवनगर, मौजे डिग्रज या भागात राहणारी शेतकरी कुटुंबातील मुले व शेतमुजरी करणाऱ्याची मुले त्यांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सांगली, मिरज व अन्य ठिकाणी जावे लागते कारण या गावांच्या जवळ विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कोणतीही सोय उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील मुले हे शेतातील वाडी,वस्तीवर राहण्यास असल्याने त्यांना शिक्षण संस्थामध्ये जाण्यासाठी प्रवासी वाहनांची सोय वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच ऊन, वारा, पाऊस अश्या वेळेस त्यांना शैक्षणिक संस्थामध्ये जाण्यासाठी खुप अडचणी निर्माण होतात.
बिसुर, खोतवाडी, वाजेगाव, नांद्रे, नावरसवाडी, कर्नाळ, पद्माळ, बुधगाव, माधवनगर,मौजे डिग्रज या भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठीआहे. त्यामुळे या ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासंदर्भात भवितव्याच्या विचार करून सोईनुसार सर्व गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी शासन स्थरावर आपल्याकडून उच्च माध्यमिक महाविद्यालय सुरु करून विद्यार्थ्याना न्याय देण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणीही केली आहे.