• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“मंत्रिमंडळातील एक राखीव जागा जयंत पाटलांसाठी” ; अजित पवार गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

Admin by Admin
December 16, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
“मंत्रिमंडळातील एक राखीव जागा जयंत पाटलांसाठी” ; अजित पवार गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.

मात्र मंत्रिमंडळातील एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे. हे मंत्रिपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आले? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. मात्र याचे उत्तर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिले आहे. पण त्यांच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्रीपद कोणासाठी रिकामे ठेवण्यात आले आहे असे विचारण्यात आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी महत्वाचे विधान केले आहे. मंत्रीमंडळातील एक जागा जयंत पाटील यांच्यासाठीच राखीव ठेवली आहे असे मिटकरी म्हणाले आहेत.

  • ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील Amol Mitkari on Jayant Patil ।

आजपासून नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज अमोल मिटकरी यांनी माध्यमांसोबत संवाद जयंत पाटील यांच्याबाबत मोठं भाष्य केलंय. अमोल मिटकरी म्हणाले की, मागे एक मंत्रिपद त्यांच्यासाठी खाली ठेवलं होतं. मात्र लोकसभेत चांगलं यश मिळालं आणि ते आले नाही. आता एक जागा राखीव ठेवली आहे ती वन डाऊनसाठी ठेवली आहे. मला जेवढी माहिती आहे, ते लवकरच आमच्यात येतील. योग्य वेळी योग्य निर्णय ते घेतील. मंत्रीमंडळातील एक जागा त्यांच्यासाठीच राखीव आहे, असे त्यांनी म्हटले.

  • भुजबळ राज्यसभेवर जाणार

तर मंत्रीमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मी नाराज असल्याचे भाष्य केले आहे. याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, “भुजबळ नसल्याने ओबीसी बांधव नाराज असल्याचं दिसलं. मात्र भुजबळ हे राज्यसभेवर जाणार आहेत. मुनगंटीवार, केसरकर यांना शपथ घेता आली नाही. तिन्ही पक्षातील नाराजांसोबत बोलतील. नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांवर फोकस झालं पाहिजे, “असे त्यांनी म्हटले आहे.

Previous Post

ब्रेकिंग | ‘तुम्ही हे केले असते तर..’ तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित..!

Next Post

ब्रेकिंग | शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षातून एकदाच, विधेयक मंजूर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षातून एकदाच, विधेयक मंजूर

ब्रेकिंग | शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षातून एकदाच, विधेयक मंजूर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group