काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.राजू वाघमारे शिंदे गटात प्रवेश करताना म्हणाले, काही ठराविक नेत्यांच्या हाती काँग्रेस दडलेली आहे, अशी टीका वाघमारे यांनी केली.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने जयंत पाटील यांचे राज्याला उद्देशून पत्र
गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!#गुढीपाडवा pic.twitter.com/GvtuaMT8Zg
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 9, 2024
गुढीपाडव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राज्याला उद्देशून पत्र. महात्म्यांची परंपरा लाभलेल्या राज्यात आज परिस्थिती बदललेली. तत्वांशी तडजोड करत नितिमत्तेची चाळण करणारे समाजभेदी विचार डोक वर काढत आहे. राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव झालाय. काळी माती संकटात आणि शेतकरी हतबल झालाय. येणाऱ्या लोकसभेत तुतारीला मत देऊन राज्याचे चित्र बदल्यांचे आवाहन.

