मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज येथील कोळेकर मठाच्या मैदानावर आज उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. सर्वत्र भगवे तुफान आले होते. या सभेत सांगली जिल्हय़ात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झंझावात निर्माण केला. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, फडणवीस, मिंधे, भाजपचा खोटा प्रचार यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री मिंधेंचे अक्षरशः वाभाडेच काढले. ‘आत्ताच वाचले की, मिंधेने आमदारांना दम दिला म्हणे, सर्वांच्या कुंडल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता मिधेंचा पराभव करणारच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणतेही काम शिल्लक राहणार नाही. या कुरमुडय़ा ज्योतिषाकडे 40 पोपट आहेत. 40 पोपट घेऊन झाडाखाली कितीही कुंडल्या बघत बस. दाढी वाढवलीच आहे तर ती आणखी वाढवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधेंची खिल्ली उडवली.

