मुंबई – गोपनीय खबऱ्या | ऑनलाइन प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेले ६७० पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर २० आणि २१ फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर यांचे तीव्र पडसाद उमटत अनेकांनी या विषयी तक्रार दाखल करत हा प्रश्न लावून धरला होता.
परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच परीक्षेबाबत विश्वासहर्ता कायम राहावी या उद्देशाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.