• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लाचखोरांची संख्या वाढली..!

Admin by Admin
November 20, 2023
in क्राईम, विशेष, सामाजिक
1 min read
0
लाचखोरांची संख्या वाढली..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परिक्षेत्रात लाचखोरीच्या प्रकरणांची पंचाहत्‍तरी

अमरावती खबऱ्या : जिल्हा प्रतिनिधी / लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे परिक्षेत्रात साडेदहा महिन्यांत लाचखोरीच्या गुन्ह्यांच्या संख्येने पंचाहत्‍तरी गाठली आहे. याच कालावधीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुन्ह्यांच्या संख्येत १९ ने वाढ झाली आहे.

राज्यात दररोज कोठे ना कोठे लाच घेताना सरकारी अधिकारी, कर्मचारी पकडले जात आहेत. लाचखोरीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत असून चालू वर्षी राज्यात १ जानेवारी ते १६ नोव्‍हेंबर या कालावधीमध्ये ७२८ लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एसीबीच्या नाशिक परिक्षेत्रामध्ये सर्वाधिक १४७ गुन्हे दाखल झाले आहेत.

पुणे परिक्षेत्रात १२७, छत्रपती संभाजीनगर ११६, ठाणे परिक्षेत्रामध्ये ९४ गुन्हे दाखल झाले आहेत. अमरावती परिक्षेत्रात दाखल झालेल्‍या गुन्‍ह्यांची संख्‍या ७५ वर पोहचली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा अमरावती परिक्षेत्रातील लाचखोरीच्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी साडेदहा महिन्यांमध्ये लाचेसंबंधी ५६ गुन्हे आणि एका अन्‍य भ्रष्‍टाचार प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. यंदाच्या लाचखोरीच्या ७५ गुन्ह्यांमध्ये लाच घेताना विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीदेखील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या असून एकूण आरोपींची संख्या १०४ इतकी आहे. यावर्षी आतापर्यंत अन्य भ्रष्टाचाराचा एक गुन्हा दाखल झाला आहे.

शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी किंवा कर्मचारी यांच्‍यामार्फत नागरिकांची शासकीय कामे अडवून ठेवली जातात. अनेकवेळा लाचेची मागणी केली जाते. ‘लाच स्‍वीकारणे हा गुन्‍हा आहे’, असे फलक कार्यालयांमध्‍ये लावण्‍यात आलेले असतानाही लाचखोरीचे प्रकार थांबत नाहीत. त्‍याला आळा घालण्‍यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्‍यात येत आहे.

यंदा १ जानेवारी ते १६ नोव्‍हेंबर या कालावधीत अमरावती परिक्षेत्रात सर्वाधिक गुन्‍हे हे अमरावती जिल्‍ह्यात नोंदविण्‍यात आले असून त्‍यांची संख्‍या १३ इतकी आहे. अकोला जिल्‍ह्यात १०, यवतमाळ १३, बुलढाणा १४ आणि वाशीम जिल्‍ह्यांत १५ गुन्‍ह्यांची नोंद झाली आहे. गेल्‍या वर्षी याच कालावधीत ५६ गुन्‍ह्यांची नोंद झाली होती. यंदा ही संख्‍या १९ ने वाढली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लावण्यात आलेले सापळे आणि पकडण्यात आलेल्या लाचखोरांमध्येही वृद्धी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

Previous Post

ब्रेकिंग | मंगळवार पेठेत तरुणाचा खून..!

Next Post

Sangli Crime : सांगली मिरजेत चोरट्यांची दिवाळी जोरात, अनेक घरं फोडून लाखोंचा ऐवज लुटला : तक्रारी करून नागरिक हतबल ; भीतीचे वातावरण.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

Sangli Crime : सांगली मिरजेत चोरट्यांची दिवाळी जोरात, अनेक घरं फोडून लाखोंचा ऐवज लुटला : तक्रारी करून नागरिक हतबल ; भीतीचे वातावरण.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group