Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

क्राईम | महिलांबद्दल मनात यायची आंबट भावना अन् आतून खुलायचा आठवले..! अश्लिल स्टेटस ठेवल्याच्या रागातून खून करीत त्याला यमसदनी पाठवले.?

Admin by Admin
October 10, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
क्राईम | महिलांबद्दल मनात यायची आंबट भावना अन् आतून खुलायचा आठवले..! अश्लिल स्टेटस ठेवल्याच्या रागातून खून करीत त्याला यमसदनी पाठवले.?

.

सांगली जिल्ह्यात चोऱ्या , घरफोड्या, खून , मारामाऱ्या हे दैनंदिन व नित्याचे झाले आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विचित्र प्रकारे वेगळ्याच कारणाने युवकाची हत्या करण्यात आली. पोलीस ठाण्याचा गोपनीय विभाग इतका पॉवरफुल आहे की नेहमीच तो फुल्ल असतो.खून होवून चार दिवस झाले तरी त्याला कानोकानी खबर सुध्दा लागत नाही. कवठेमहांकाळ पोलीस प्रशासनाच्या या “आपल्याच तंद्रीत” कारभाराची चर्चा मात्र संपूर्ण जिल्ह्यात गाजली. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेच्या कारभाऱ्याला बोलावून त्याची विशेष ओळख व मुलाखत करून घेणं अत्यंत गरजेचे आहे. असे नागरिक कवठा तहसील कार्यालयाच्या आवारात बिनधास्त बोलत होते.

कवठेमहांकाळ : खबऱ्या प्रतिनिधी / महिलांच्या फोटोखाली आक्षेपार्ह मजकूर लिहून व्हॉटस्ॲपच्या स्टेटसला ठेवणे, तसेच अश्लिल मेसेज मोबाईलवर पाठविणे, याचा राग मनात धरुन कवठेमहांकाळ शहरातील पाच जणांनी सुशिल सुर्यकांत आठवले (वय २३) या तरुणाचा अपहरण करुन लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करत खून केला होता.

पोलिस पथकांच्या अथक शोधानंतर तब्बल सातव्या दिवशी आज (दि.१०) सुशिल याचा मृतदेह लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) च्या हद्दीत बोगद्यातून गेलेल्या म्हैसाळ योजनेच्या कालव्यात सापडला.

याप्रकरणी पाच संशयित आरोपी यापूर्वीच अटकेत आहेत. पण आणखी काही जणांचा गुन्ह्यामध्ये समावेश असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासात त्यांची नावे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर पण खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली आहे.

कवठेमहांकाळ शहरामधील एका २३ वर्षीय तरुणाचा खून करुन मृतदेह म्हैसाळ योजनेच्या कालव्यात टाकण्यात आला आहे, अशी चर्चा बुधवारी (दि. ४) कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात सुरु झाली होती. दरम्यानच्या काळात कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी गुरुवारी (दि. ५) स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर हजर होत आपण खून केला असल्याची कबुली दिली. परंतु मृतदेह सापडला नसल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला नव्हता.

Previous Post

बेवड्याला वाचवण्याच्या नादात पोलिसांची बोलेरो पलटी..? तीन पोलीस कर्मचारी जखमी : अपघातस्थळी दारूच्या बाटल्या..!

Next Post

विभागातील तहसीलदारांची होणार दफ्तर तपासणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

विभागातील तहसीलदारांची होणार दफ्तर तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014