कडेगाव :- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असले तरी काही झारीतील शुक्राचाऱ्यांमुळे प्रशासन नाहक बदनाम होत आहे. वडीये रायबाग येथील घटनेनंतर आता येथील तलाठी वैभव तारळेकर यांनी नदीत जाणाऱ्या रस्त्यांना चरी मारल्या आहेत. याठिकाणी सुरु असलेली अवैध वाळू तस्करी प्रशासनातील काही लोकांच्या आशिर्वादामुळेचं सुरु होती अशी कुजबुज आहे.
वडीये रायबाग येथे अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी रस्त्यांना चरी मारल्या असल्या तरी याठिकाणच्या अवैध वाळू तस्करीला मदत करणाऱ्या प्रशासकीय लोकांना कारवाई इंगा दाखवला पाहिजे अशी येरळा काठच्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. अवैध वाळू तस्करी करताना वाहने पकडली किंवा पकडण्यासाठी याठिकाणी गेले असता झारीतील शुक्राचारी लगेच फोनफोनी करून कारवाई थांबवतात असं एका प्रशासकीय व्यक्तीने नाव ना सांगण्याच्या अटीवर खबऱ्याला सांगितले आहे.
एकूणच तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी प्रथम झारीतील शुक्राचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे.