कोल्हापुरात निर्भया पथकाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण कॉलेजच्या आवारात घुटमळणाऱ्या तरुणाला महिला पोलीस अधिकाऱ्याने श्रीमुखात लगावली. तसेच इतर तरुणांना देखील लाठीचा प्रसाद दिला. संबंधित कारवाई कॅमेऱ्यात कैद झालीय.
कोल्हापूर | राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातील महिला आणि मुली संरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्यामागील कारणंही अगदी तसंच आहे.
राज्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. दर महिन्याला हजारो मुली प्रत्येक जिल्ह्यातून बेपत्ता होत आहेत. असं असताना देखील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत. कल्याणमध्ये नुकतंच एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता पोलीसही सतर्क झाले आहेत.

