बीआरएसचे नेते आणि माजी आमदार राजू तोडसाम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदारांवर बॉम्ब हल्ला करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. पालकमंत्री, लोकप्रतिनिधींवर बॉम्ब हल्ले करण्यासाठी तयार रहा, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना जाहीरपण केलं. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळच्या हजारो शेतकरी, शेतमजूर यांच्या उपस्थितीत बीआरएसचे नेते माजी आमदार राजू तोडसाम यांनी मोर्चा काढला होता. या दरम्यान त्यांनी बॉम्ब हल्ला करण्याचा सल्ला उपस्थित शेतकरी आणि नागरिकांना दिला.