जत (प्रतिनिधी): मुंबई पावसाळी अधिवेशन येथे उमदी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते संजय तेली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जत तालुक्याचे त्रिभाजन करून स्वतंत्र उमदी तालुका करावा यासाठी निवेदन दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. व महसुल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची भेट घेतली त्यांनी आठ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थीत होते.