कोल्हापूर (खबऱ्या प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कत्तलखाण्यात विकण्याच्या लायकीचे आहेत, अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते आणि बीआरएस मध्ये प्रवेश केलेले रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. ९ ऑगस्टला इस्लामपूर येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा करण्यात येणार असल्याबाबतची माहिती पत्रकारांना देताना ते बोलत होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम लक्षात घेऊन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ ऑगस्टला क्रांतीदिनी इस्लामपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान होणार आहे, अशी माहीती रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चंद्रशेखर राव हे शेतकऱ्यांचे मसीहा आहेत त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असून पंतप्रधान मोदी आणि फडणवीस हे कत्तलखान्यात विकण्याच्या लायकीची असल्याची घणाघाती टीका पाटील यांनी केली. दरम्यान ९ ऑगस्ट ला क्रांती दिनी मोठ्या संख्येने शेतकरी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

