महाराष्ट्रात एका पोलीस कर्मचार्याने (Maharashtra Police) रजेसाठी असा अर्ज केला, की वरिष्ठ अधिकारी चक्रावले. सध्या याची जोरदार चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
अमरावती (Amravati) जिल्ह्यात एका पोलीस कर्मचार्याने पोलीस ठाणे प्रमुखांना रजेचा अर्ज दिला. मराठी भाषेत लिहिलेल्या या अर्जात कर्मचार्याने लग्नाच्या वाढदिवसाला (Marriage Anniversary) पश्चात्ताप दिवस (Day of Repentance) म्हटले आहे. आता हा अर्ज चर्चेचा विषय बनला आहे. हा अर्ज सोशल मीडियावरही (Social Media) खूप व्हायरल होत आहे. (Maharashtra Police)
कृपया पश्चात्ताप दिवसासाठी रजा द्यावी
हा पोलीस कर्मचारी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात (Mangrul Dastgir Police Station Amravati) तैनात आहे. 28 मार्च रोजी त्याने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रजेसाठी अर्ज केला. ठाणे प्रमुखांना दिलेल्या अर्जात 27 मार्चच्या साप्ताहिक सुट्टीऐवजी 29 मार्चला लग्नाच्या वाढदिवसाला सुट्टी देण्यात यावी, असे लिहिले आहे. पोलीस कर्मचार्याने पुढे लिहिले आहे की, कृपया लग्नाच्या वाढदिवसाला म्हणजेच ‘पश्चात्ताप दिना’ला सुट्टी मिळावी. (Maharashtra Police)
विविध ग्रुपमध्ये शेयर होतोय अर्ज
हा अर्ज बाहेर येताच त्यावर विनोद सुरू झाले आहेत. हा अर्ज सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेयर केला जात आहे. तो वाचून लोक हसत आहेत. काही लोक या पोलीस कर्मचार्याला साथ देत आहेत तर काही स्वत:शी याची तुलना करत आहेत. पोलीस विभागातही या अर्जाची जोरदार चर्चा आहे.
—
अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही
त्याच वेळी, या रजेच्या अर्जाबाबत अर्जदार किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकार्याने कोणतेही विधान केलेले नाही. मात्र, कर्मचार्याला सुट्टी दिली गेली असावी, असे बोलले जात आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी मध्य प्रदेशातून सुद्धा अशी बातमी समोर आली आहे.
येथील दिलीप अहिरवार नावाच्या पोलीस कर्मचार्याने रजेचा अर्ज करून बायकोच्या भावाच्या लग्नासाठी रजा मागितली होती. अहिरवार यांनी आपल्या अर्जात लिहिले होते की, मेहुण्याच्या लग्नाला जाणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पत्नीने धमकी दिली आहे की, भावाच्या लग्नाला आला नाही तर परिणाम चांगला होणार नाही. या प्रकरणाची सुद्धा खूप चर्चा झाली होती.