इस्लामपूर : खबऱ्या प्रतिनिधी/ राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त व राष्ट्रीय पुरस्कार नामांकन प्राप्त आदर्श शिक्षिका, मुख्याध्यापिका, प्रभारी केंद्रप्रमुख शांता पाटील यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. समाजसेवक व आमदार श्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात व राज्याध्यक्ष राजगुरू सर यांच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या सांगली जिल्हा प्रहार शिक्षक व शिक्षकेतर संघटना यांच्या वतीने आपुलकीचा सत्कार करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले तारिक अत्तार यांचे कामही विद्यार्थी विकासात हातभार लावणारे आहे. असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना शांता पाटील म्हणाल्या की,पालकांच्या सहकार्याने गावातील नागरिकांच्या सहकार्यातून व शिक्षण विभागातील सर्वच अधिकाऱ्यांच्या प्रेरणेने नक्कीच हे काम करता आले. प्रहार संघटना निश्चित चांगले काम करत असून शिक्षकांच्या प्रश्नावर प्रहार करणारी प्रहार संघटना आहे.
याप्रसंगी सुभाषराव पाटील ,प्रहार जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर, सरचिटणी अमोल जाधव,तालुका सरचिटणीस सचिन बामणे, पत्रकार व मार्गदर्शक श्री दत्तात्रय फसाले, मार्गदर्शक मुश्ताक मोमीन, शिक्षकेतर कर्मचारी अध्यक्ष राजन शिंदे,मार्गदर्शक शहाजी शिंदे, कैलास दाभाडे , वसंत कोकणे- चौधरी, दीपक पाटील , राजू पवार , राजमाने, विक्रम पाटील ,प्रशांत लाडे,रमेश भैरगुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. आभार पाटील सर यांनी मानले.

