• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज परिसरात अपघातानंतर कार पेटली; कुटुंब बचावले..

Admin by Admin
January 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज परिसरात अपघातानंतर कार पेटली; कुटुंब बचावले..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी: रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्यावर बोलवाडनजिक अपघातानंतर कारने पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आतील कुटुंबाला बाहेर काढल्याने ते बचावले.

मात्र, अपघातात ते जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम अपूर्ण आहे. तरीही वाहतूक सुरू आहे. वारंवार मागणी करूनही महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे. पंढरपूर रोडकडून राष्ट्रीय महामार्गावरून आलेल्या कारला हनुमान नगर येथे अपघात झाला. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर टाकण्यात आलेल्या माती व खडीच्या ढिगावर कार गेल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातग्रस्त कारमध्ये मेहता कुटुंबातील पती – पत्नी व त्यांची तीन लहान मुले असे पाच जण होते. येथील स्थानिक नागरिक व परप्रांतीय कामगारांनी गाडीच्या काचा फोडून या कुटुंबाला बाहेर काढले. अपघातात ते जखमी झाले होते. यावेळी अपघातग्रस्त कारने पेट घेतला. शहर पोलिस व अग्निशमन दलास याबाबत माहिती देण्यात आली. मिरज शासकीय रुग्णालयातील रुग्णवाहिकेसही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवली. मात्र, तोपर्यंत कार जळाली होती. रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous Post

आष्ट्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना; प्रशासनाने मध्यरात्री पुतळा हटविला

Next Post

मिरजेतील “त्या” प्रकरणात ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील “त्या” प्रकरणात ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!

मिरजेतील "त्या" प्रकरणात ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group