मिरज- खबऱ्या प्रतिनिधी: अखेरीस मिरजेतील ते झाड आणि त्या हॉटेल रहीमतुल्ला या हॉटेलचे अतिक्रमण काढलं आहे. या अतिक्रमना विरोधात मिरज शहर परिवर्तन समितीचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. वादग्रस्त झाड आणि अतिक्रमण काढल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा इशारा मिरज शहर परिवर्तन समितीचे प्रमुख मुस्तफा बुजरूक यांनी दिला. अतिक्रमणास विरोध करू नका असं आवाहन माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी जनतेला केलं. तर अतिक्रमण काढण्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर कारवाई केली जाईल असा इशारा माजी महापौर विवेक कांबळे यांनी दिला. तर सदर हॉटेलची जागा शासनाची असून हॉटेल मालक चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण काढण्यास विरोध करत आहे असा आरोप माजी नगरसेवक अय्याज नायकवडी यांनी केला आहे. सुरवातीला हॉटेल मालक चालकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. अधिकारी यांच्या सोबत वादावादी झाली. काही काळ या ठिकाणी वातावरण तंग झालं होतं. मात्र आंदोलक, जनतेचा रेटा यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात जेसीबी चालवला तर काही बांधकाम स्वतः हुन काढून घेण्यात आल. मिरज शहर परिवर्तन समितीच्या आंदोलनास यश आलं आणि झाड आणि ते अतिक्रमण काढण्यात आलं.
सांगली महापालिकेच्या वतीने मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड वरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली. मात्र अतिक्रमण काढण्याची मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली. मोठ्या हॉटेल व्यवसायिकांचं अतिक्रमण काढला जात नाही मात्र छोट्या व्यावसायिकांच्या वर कारवाई केली जात असल्याचा आरोप झाला. सरसकट अतिक्रमणाची मोहीम राबवा अशी मागणी करत मिरज परिवर्तन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. सुरुवातीला नारमाईची भूमिका घेणारे अधिकाऱ्यांनी सुद्धा कार्यकर्ते आणि जनतेचा रोष बघून कारवाई करण्यास सुरुवात केली.
दरम्यान सदरची जागा आमच्या मालकीची असून आमच्यावर होत असलेल्या आरोप चुकीचे आहेत असं स्पष्टीकरण हॉटेल रहमतुलाचे चालक वाहिद तहसीलदार यांनी दिली आहे.
वाहिद तहसीलदार (हॉटेल रहमतुलाचे चालक)