• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खा म्हणावं पैसे अजून किती पाहिजेत? अशा उद्विग्न शब्दात महसूलवरील नाराजी केली व्यक्त

लाचखोर तलाठी मनीषा कुलकर्णीला अटक करून घेऊन जाताना ग्रामस्थांकडून फटाक्यांची आतिषबाजी

Admin by Admin
October 11, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो
1 min read
0
खा म्हणावं पैसे अजून किती पाहिजेत? अशा उद्विग्न शब्दात महसूलवरील नाराजी केली व्यक्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील लाचखोर तलाठी मनीषा कुलकर्णी हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले व नंतर अटक केली. अटक करून घेऊन जात असताना खेराडे वांगी ग्रामस्थांनी अक्षरशः फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला आणि “खा म्हणावं आता पैसे अजून किती पाहिजेत?” अशा उद्विग्न शब्दात आपली महसूल प्रशासनावरील नाराजी व्यक्त केली. एखाद्या तलाठयावर कारवाई झाल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष करणे ही बहुधा महसूल च्या इतिहासातील पहिलीच घटना असावी आणि या घटनेनंतर तरी कडेगाव महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

खेराडे वांगी ता कडेगाव येथील महिला तलाठी मनीषा कुलकर्णी हिला सोमवारी दि १० ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. सातबारा वरील चुकीची आणेवारी दुरुस्त करण्यासाठी तब्बल २० रुपयांची लाच मागून तडजोडी अंती १५ हजार रुपये स्वीकारताना कुलकर्णी हिला रंगेहात पकडले गेले होते. त्यांनतर रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुलकर्णी हिला ताब्यात घेत अटक करून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी अगोदरच तयारी करून ठेवल्याप्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. ग्रामस्थांच्या जल्लोषावरून त्यांच्या मनात कुलकर्णी हिच्या बद्दल किती राग होता हे स्पष्टपणे जाणवले तसेच “खा म्हणावं आता पैसे अजून किती पाहिजेत?” अशा शब्दात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच शेरेबाजी करत महसूल प्रशासनावरील आपला राग व्यक्त केला.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2022/10/VID-20221011-WA0255.mp4

 

येथील ग्रामस्थांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठांनी वेळीच योग्य ती कार्यवाही केली असती तर कदाचित आजचा दिवस कुलकर्णी हिला पहावयास लागला नसता आणि खेराडे वांगी येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन लागला नसता असं मत येथे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी व्यक्त केलं.

Previous Post

सांगली : घनकचर्‍यासाठी फेरनिविदा; वादग्रस्त ठराव होणार रद्द

Next Post

मिरजेत भर पावसात पेटत्या मोटारीचा थरार…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत भर पावसात पेटत्या मोटारीचा थरार…

मिरजेत भर पावसात पेटत्या मोटारीचा थरार...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group