मिरज प्रतिनिधी : लखन लोंढे : गोपनीय खबऱ्या महामिडिया / मिरज येथील बेळगांव गेट झोपडपट्टी धारकांच्या पूर्नवसन आणि झोपड्या काढण्याची कारवाई तातडीने थांबवावी यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
नगरसेविका स्वाती पारधी यांनी दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, मिरज अर्जुनवाड रस्त्यावरील बेळगांव गेट येथे सुमारे १५० घरे सेंट्रल रेल्वेच्या जागेवर गेली ४० वर्षापासून आहेत. सध्या या घरांना रेल्वेकडून जागा रिकामी करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या आहेत.
हे सर्व नागरीक सर्वसामान्य आहेत. गरीबीतून जीवन जगत आहेत. सध्य स्थितीला त्यांना जगणे मुश्किल बनले आहे. त्यातच आता रेल्वेकडून जागा सोडण्यासाठी २७ सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. गेली ४० वर्षे अनेक कुटूंबे या ठिकाणी राहत आहेत त्यामुळे या सर्व कुटूंबाचे महानगर पालिके कडून पुनर्वसन व्हावे आणि झोपडया काढण्याच्या कारवाईला कायमची स्थगिती देण्याबाबत रेल्वे मंत्र्यांशी बोलून या सर्व झोपडपट्टी धारकांना आधार आणि दिलासा द्यावा.
सद्य परिस्थितीला सर्वासमोर कोणताच निवा-याचा पर्याय नाही. त्यामुळे रेल्वेकडून कारवाई झाल्यास येथील कुटूंबे रस्त्यावर येतील. त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी रेल्वेकडून होणारी कारवाई थांबवावी आणि या सर्व झोपडपट्टी धारकांना आहे त्याच ठिकाणी किंवा पर्यायी जागा देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन आज मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे.


