कडेगाव:- केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई- केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यास केंद्र शासनाकडून दि. ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तरी पी. एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांपैकी ज्यांनी यापूर्वी ई -केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. सदरची ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना लाभ वाटप होणार नाही. तरी ई-केवायसी दि. ७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन कडेगावच्या तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना स्वतः प्रधानमंत्री किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वैयक्तिकरित्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. किंवा संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करता येईल.

