सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; सातारा , सांगली, रत्नागिरीसह साेलापूर जिल्ह्यात वादळी वा-यासह गुरुवारी रात्री पाऊस झाला.
आज (शुक्रवार) सकाळपासून या जिल्ह्यांत पावसाच्या सरी काेसळत आहेत. दरम्यान गुरुवारी झालेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात वळसंग ते पाचापुर पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने साेलापूर तसेच सातारा जिल्ह्यात आज वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सांगली जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळ पासून पावसाने हजेरी लावली. विशेषत: जत या दुष्काळी भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. वळसंग ते पाचापुर पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे.
सोलापूर शहरात गुरुवारी दुपारपासून मुसळधार पाऊस झाला. गत चोवीस तासात सोलापुरात ३६.१ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील विजापूर रोड येथील नेहरू नगर शासकीय मैदानाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान पंढरपूरात आजही पहाटे पासून पावसाची संततधार सुरु हाेती. येथे गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

