• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

रेठरेहरणाक्ष येथे विजेचा धक्का बसून शेतकर्‍याचा मृत्यू

Admin by Admin
July 4, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील म्हसोबा दरी शिवारात विजेचा धक्का बसून एका तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. सुहास राजाराम पवार (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवार, दि. ३ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुहास पवार यांची रेठरेहरणाक्ष येथील डोंगराच्या पायथ्याला म्हसोबा दरी शिवारात शेती आहे. शुक्रवारी सकाळी ते ट्रॅक्टरने आपल्या शेताची मशागत करत होते. यावेळी शेतातील मीटर पेटीतून बोअरवेलकडे जाणारी विजेची वाहिनी खाली शेतात आडवी पडली होती. सुहास हे विजेची वाहिनी बाजूला करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.

शिवारातील इतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने विद्युत प्रवाह बंद केला. सुहास यांना तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सहायक उपनिरीक्षक बळीराम घुले या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

राजकीय, सामाजिक चळवळीत सक्रिय

सुहास पवार हे वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होते. आमदार जयंत पाटील व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. याशिवाय, भवानीनगर येथील जागृती साहित्य संस्कार मंडळाचे संस्थापक सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित
Previous Post

सांगली ब्रेकिंग | वेदांत बंडगर हत्याप्रकरणी ‘मोक्का’चा प्रस्ताव सादर, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती

Next Post

एचएसआरपी नसलेल्या ४२ वाहनांवर कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | ‘एचएसआरपी’ नसल्यास दंड एक हजार, पावती मात्र दोन हजाराची; ई-चलानामुळे आरटीओ अधिकारीही संभ्रमात

एचएसआरपी नसलेल्या ४२ वाहनांवर कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group