माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांचे सोमवार, दि. २३ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच शिरवळपासून माण तालुक्यातील दहीवडीपर्यंत त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर ना. जयकुमार गोरे प्रथमच सातारा जिल्ह्यात येत आहेत. शिरवळ, नायगाव, खंडाळा, सातारा, कोरेगाव, पुसेगाव आणि माण तालुक्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता पुणे येथून ते साताऱ्याकडे प्रस्थान करणार आहेत. १० वाजता शिरवळ येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. १० : ३० वाजता ते नायगाव क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले स्मृती स्थळास भेट देवून अभिवादन करणार आहेत. ११ वाजता खंडाळा येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ११ : ३० वाजतता कवठे येथे किसनवीर आबा यांच्या स्मृती स्थळास ते अभिवादन करणार आहेत.
दुपारी १२ वाजता सातारा वाढे फाटा मार्गे भू विकास बँक येथे आगमन पुढे पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पांजली व अभिवादन करणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे दुपारी १ वाजता कोरेगाव येथे आगमन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
२ वाजता पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराज संजीवन समाधीचे ते दर्शन घेणार आहेत. २ : ३० वाजता पांढरवाडी येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. २ : ४५ वाजता महिमानगड येथे आगमन व स्वागत तसेच ३ वाजता पिंगळी येथे स्वागत समारंभ पार पडणार आहे. सायंकाळी ४ वाजता दहिवडी येथे स्वागत मिरवणूक रिलायन्स पेट्रोल पंप मार्गे एस. टी. स्टॅन्ड, फलटण चौक मार्गे सिद्धनाथ मंदिर येथे येणार आहे.

