महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांवरुन हल्लाबोल केला आहे.
आज त्यांनी आपला आगामी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. पुणे येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
1) राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार, 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार
2) भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूंनाच नाही तर मुस्लिमांनाही होतो
3) भोंग्यांचा विषय धार्मिक नाही तर सामाजिक आहे
4 ) त्यांनी जर पाचवेळा भोंगा लाऊन अजान म्हटली तर आम्ही देखील पाचवेळा मशिदींसमोर आरती म्हणू
5) सर्व मशिदीवरील भोंगे अनधिकृत आहेत तर आमच्याच कार्यकर्त्यांचे भोंगे का काढले जात आहेत.
6) एका मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितले की त्यांचे बाळ लहान असताना त्यांना भोंग्याचा त्रास झाला. त्यांनी स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितला
7 ) आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल तर गप्प बसणार नाही, देशभरातील सर्व हिंदु बांधवांनी तयार राहावं
8 ) आमच्या हातात शस्त्रे घ्यायला भाग पाडू नका
9 ) जर यांना देशाचा कायदा आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा स्वतःचा धर्म मोठा वाटत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल
10 ) महाराष्ट्रातील शांतता भंग करायची नाही पण भोंगे बंद करा

