Sunday, June 8, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | पोलीस अधीक्षकांचा दणका : जिल्ह्यात खळबळ..! कर्तव्यात कसूर केली अन् धुमाळ, नरळे, मुल्ला झाले निलंबित..?

Admin by Admin
November 10, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
मोठी बातमी | पोलीस अधीक्षकांचा दणका : जिल्ह्यात खळबळ..! कर्तव्यात कसूर केली अन् धुमाळ, नरळे, मुल्ला झाले निलंबित..?

 

जत: खबऱ्या प्रतिनिधी/ कमी दरात सोने देतो, असे सांगून आंध्रप्रदेशातील एका सुवर्णकाराची साडेसव्वीस लाखाची पाच जणांनी फसवणूक केली होती. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. ही घटना गुरुवारी (दि.२) नोव्हेंबर रोजी घडली होती. याच प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आज (दि.९) ३ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी केली आहे. यामुळे या प्रकरणातील गुंता आणखीच वाढत चालला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नेहमीच चर्चेत असणारे व सध्या निलंबित केलेले पोलीस कर्मचारी

जत पोलीस ठाण्याकडील समीर जबरदस्त मुल्ला (पोलीस शिपाई), विजय मच्छिंद्र नरळे (पोलीस शिपाई), महादेव तुळशीराम धुमाळ (पोलीस हवालदार) या तिघांचे तडकाफडकी सेवेतून निलंबन करण्यात आले आहे. आणखी या प्रकरणात तळाशी गेल्यास प्रकरणाचे मुख्य मोहरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आंध्र प्रदेशातील एका सुवर्णकारास जत तालुक्यातील पाच जणांनी स्वस्तात सोने देतो, म्हणून बोलवून घेतले होते. यावेळी संबंधित व्यक्तीस सोने न देता त्याच्याकडील साडेसव्वीस लाखाची पैशाची बॅग पळवून नेली होती. या घटनेदरम्यान जत पोलीस कॉन्स्टेबल समीर मुल्ला व अन्य एकजण पोलीस घटनास्थळी असल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. याच वेळेला माजी आमदार विलासराव जगताप यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दरोडासारखा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. या प्रकरणातील दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केल्या असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

फरारी आरोपीना अटक; पाच दिवसाची पोलीस कोठडी

या प्रकरणातील रमेश कोळी व अमोल कुलकर्णी यांना रविवारी (दि.५) अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. तर अनिल सुतार यास वैद्यकीय कारणास्तव नोटीस देऊन कार्यवाही करण्यात आली होती. परंतु या प्रकरणातील मेहबूब जातगार, दर्याप्पा हवीनाळ मिस्त्री हे दोघे आरोपी फरारी होते. अखेर या दोघांना आज (दि.११) अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले. याप्रकरणी चौघांनाही पाच दिवसाची सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Previous Post

सांगलीतील जिल्हा कारागृहातून बंदीचे पलायन; पोलिसांकडून शोध सुरू..

Next Post

कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मिरज, कवलापूरला ‘आनंदाचा शिधा’ वाटप..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मिरज, कवलापूरला ‘आनंदाचा शिधा’ वाटप..

कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मिरज, कवलापूरला 'आनंदाचा शिधा' वाटप..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014