केंद्रातील मोदी सरकारने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कायदा मंत्रालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये एकूण 8 जणांचा समावेश करण्यात येणार आहे.अमित शाह, अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एनके सिंग, सुभाष कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी यांचा समावेश आहे.