Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, अनेकांची…!

Admin by Admin
July 23, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
0
शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, अनेकांची…!

भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या पोस्टर्सवरून सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

ते आज (23 जुलै) सांगलीत फॅबटेक मल्टीस्टेट सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. राष्ट्रवादीमधील फुटीर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिनी शुभेच्छा देताना केलेल्या ट्विटनंतर राजकीय भूवया उंचावल्या आहेत. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच असे ट्विट केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत.

सरकारला कसलाही धोका नाही

आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा असते. मात्र, सध्याचे शिंदे यांचं नेतृत्व भक्कम आहे आणि सर्वांना न्याय देणारं आहे. त्यामुळे येणारी 2024 ची निवडणूक महायुती मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात लढवेल आणि विजयी होईल. आमच्या सरकारकडे मोठे बहुमत असल्याने सरकारला कसलाही धोका नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. अजित पवारांनी आमदारांना केलेल्या निधी वाटपाचे स्वागत करत सर्व आमदार समाधानी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण आणि शहरी निधीमध्ये फरक असतो

जयंत पाटील आणि आव्हाड यांना निधी दिला नाही, यावर बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण आणि शहरी निधीमध्ये फरक असतो. त्यामुळे भविष्यात नगरविकास मधून निधी मिळेल. मात्र, मी तरी निधीवरून समाधानी आहे. राज्यात एकीकडे पावसाचा हाहाकार आहे. मात्र, सांगोला तालुक्यात पावसाची ओढ असल्याने येथील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी केली.

भाजप सेनेच्या विचारला भारावून वेगळी वाट पकडली

शहाजी बापू पाटील म्हणाले की, मी सांगलीत असताना काँग्रेसमध्ये राहून युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केले. मात्र, कालांतराने भाजप शिवसेना यांच्या विचाराने भारावून गेल्याने मी वेगळी वाट पकडली अशी कबुलीही त्यांनी दिली. महायुतीत दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कामे माझ्या मतदारसंघात झाल्याचा दावाही शहाजी बापू पाटील यांनी केला.

Previous Post

अवैध वाळू वाहतूक करणारं डम्पर सोडवण्यासाठी तलाठयाची तहसीलदारांबरोबर हुज्जत?

Next Post

नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न, भाविकांची मोठी गर्दी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न, भाविकांची मोठी गर्दी

नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न, भाविकांची मोठी गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014