• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तलाठ्यामार्फत ई पीक पाहणीची नोंद घालण्यासाठी चक्क दहा हजारांची मागणी

बदली झाली असताना जाता जाता कारनामा?

Admin by Admin
July 18, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
तलाठ्यामार्फत ई पीक पाहणीची नोंद घालण्यासाठी चक्क दहा हजारांची मागणी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकऱ्याला झाले कळायचे बंद

शेतकऱ्यांना कोणी वाली आहे कि नाही?

कडेगाव :- ऑनलाईन ई पीक पाहणी करता येत नसल्याने तलाठयाकडे आपल्या पिकाची ऑनलाईन ई पीक पाहणी नोंद करून मिळावी म्हणुन गेलेल्या शेतकऱ्याला चक्क दहा हजाराची मागणी तलाठयाकडून करण्यात आल्याने शेतकऱ्याला नक्की काय करावे हेच समजेना असं झालं. कडेगाव तालुक्यातील एका बदलीचा आदेश निघालेल्या तलाठयाच्या या मागणीने, तलाठयांना नक्की झालंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे तर तालुक्यात शेतकऱ्यांना नक्की कोणी वाली आहे कि नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कडेगाव तालुक्यात इमानदारीने सर्वसामान्य जनता आपला केंद्र बिंदू मानून कामकाज करणारे अनेक तलाठी आहेत, मात्र काही भ्रष्ट कारभार करण्याची सवय लागलेल्या लोकांमुळे संपूर्ण प्रशासनास तोंड लपवण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे. एकीकडे शासन व प्रशासन ई पीक पाहणी साठी जनजागृती करीत असताना तसेच शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल वरून ई पीक पाहणी करण्याचं आवाहन करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील एका गावात मोबाईल वर ई पीक पाहणी करता येत नसल्याने बदलीचा आदेश झालेल्या एका तलाठयाकडे गेलेल्या शेतकऱ्याला पीक पाहणीची नोंद करण्यासाठी चक्क दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती खबऱ्याला मिळाली आहे. यावरून भ्रष्ट तलाठयांनी नक्की काय चालवलं आहे याची फक्त कल्पना केलेलीच बरी.कार्यभार सोडण्यासाठी काहीसा अवधी शिल्लक राहिला असताना सुद्धा एखादा तलाठी एवढं धाडस कसं काय करू शकतो?.भ्रष्ट कारभार करणाऱ्या लोकांच्यावर कोणी अंकुश ठेवणार आहे कि नाही किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणी वाली आहे कि नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काही निवडक लोकांच्या भ्रष्ट कारभारामुळे संपूर्ण प्रशासनास तोंड लपवण्याची वेळ येत असल्याने अशा भ्रष्ट लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनते बरोबरचं महसूल कर्मचाऱ्यांमधून सुद्धा होतं आहे.

Previous Post

शेतकरी संकटात, पण काही टोळ्यांची हप्तेखोरी, विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभात्याग

Next Post

मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केला खुलासा सादर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केला खुलासा सादर

मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केला खुलासा सादर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group