मिरज पॅटर्न म्हणले की सांगलीसह महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांना मिरजेच्या राजकारणातील अनोख्या पद्धतीने खेळली जाणारी चाणक्य नीती लगेच आठवते.
मिरजेच्या राजकारणात बंडखोरांसह सत्ताधारी गटातील नेते, बेरजेचं राजकारण करताना नेमका कोण कुठल्या गटात, तर कोणी कोणत्या कोठ्यात ..? हे नेहमीच चक्रावून सोडणारे गणित आहे. यामध्ये मिरज नगरीत राजकीय सूत्रं हलवत असताना ज्येष्ठ नेते आणि काही मुरब्बी राजकारणी लोक याचे प्रतिनिधित्व करतात.
याच मिरज पॅटर्न ची चर्चा आज सोशल मीडियावर झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने थेट आपल्याच पक्षाचे नेते आणि त्यांना राजकीय वारसा देणाऱ्या त्याच्या प्रेरणास्थान या व्यक्तिमत्वाला देखील मिरज पॅटर्न आजतागायत कळाला नसल्याचे सांगत, एका नगरसेवकाला तुम्हाला ह्यातील ‘अ‘ सुद्धा कळणार नाही, असा थेट उल्लेख केला.
स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय राजारामबापू पाटील,स्वर्गीय विष्णूआण्णा पाटील, स्वर्गीय प्रकाशबापू पाटील, स्वर्गीय मदनभाऊ पाटील ,यांच्यासाहित महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री, सांगलीचे पालकमंत्री, आणि ज्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने ‘काहीच कळत ‘ नसल्याचा उल्लेख केला, अशा स्वाभिमानी कार्यकर्त्याचा प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माननीय जयंतराव पाटील यानां मिरज पॕटर्न कळाला नाही आणि कळणार पण नाही ,असं बोलण्याचे धाडस करून मिरजकरांच्यात “आयडेंटी” तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे का.?? असा प्रश्न आता सर्वाना पडला आहे.
तर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला “तुम्हाला तर त्यातला ‘अ ‘ पण कळणार नाही. अस माझं वैयक्तीक मत आहे.” या शब्दांत ‘त्यांनी’ आपले मतप्रदर्शन सोशल मीडियावर केल्यानंतर मोठी चर्चा सर्वत्र रंगली होती.