• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अनवाणी माणसांच्या जगण्याच्या व्यथा ‘वंचितांचे अंतरंग’ मधून उलगडल्या : प्रा. डॉ. रणधीर शिंदे

कवी अशोक पवार यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Admin by Admin
March 3, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
अनवाणी माणसांच्या जगण्याच्या व्यथा ‘वंचितांचे अंतरंग’ मधून उलगडल्या : प्रा. डॉ. रणधीर शिंदे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. स्वाती पवार, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांची प्रमुख उपस्थिती

कडेगाव :- कवी अशोक पवार यांनी वंचितांचे अंतरंग या काव्यसंग्रहातून भटक्या समाजाच्या वेदना आणि व्यथा मांडल्या आहेत. अनवाणी माणसांच्या जगण्याच्या व्यथा या काव्यसंग्रहातून उलगडल्या आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या परिवर्तनाचा परागंदा आणि निराधार माणसांचे जगण्याचं जग पवार यांच्या कवितेतून पहावयास मिळते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.

शिवणी (ता. कडेगाव ) येथील कै. बापू पवार व के. शांताबाई पवार यांच्या स्मरणार्थ के. बापूराव पवार फाउंडेशनच्या वतीने आयोजित कवी संमेलन व ले पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी कवयित्री डॉ स्वाती पवार होत्या तर कविसंमेलनाध्यक्षपदी प्रा डॉ रामदास नाईकनवरे होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कवी अशोक पवार यांनी लिहलेल्या वंचितांचे अंतरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष दलितमित्र संपतराव पवार यांनी केले. सुत्रसंचालन सुरेश जाधव यांनी केले. सुरेश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास सरपंच विजया पवार दिलीपराव उर्फ बाळासाहेब पवार, पोलिस पाटील बाळासाहेब पवार, आनंदराव पाटील, सतिश लोखंडे, राहूल विर, अमृतवेलचे धर्मेंद्र पवार आदींसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शांतिनाथ मांगले यांनी सूत्रसंचालन केले. अशोक पवार यांनी आभार मानले.

फोटो ओळ:- शिवणी कवी अशोक पवार लिखित ‘वंचितांचे अंतरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. रणधीर शिंदे, डॉ. स्वाती पवार, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे, संपतराव पवार अशोक पवार आदी.

कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. संमेलनात विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सादर झाल्या. यामध्ये किरण शिंदे, सु. धो.मोहिते, रमेश जावीर, सई ज्ञानेश्वर जाधव, राजाराम करांडे, गझलकार सिराज शिकलगार, यशवंत चव्हाण, शांतीनाथ मांगले, निवांत कवळे, वाय. एस. पवार,सुभाष पाटील यांनी कविता सादर केल्या.

Previous Post

सांगली, सातारा जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कप्रमुखपदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

Next Post

येतगाव सोसायटीचा कारभार सचिवांशिवाय ; दोन महिन्यांपासून सचिव नाहीत..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
येतगाव सोसायटीचा कारभार सचिवांशिवाय ; दोन महिन्यांपासून सचिव नाहीत..!

येतगाव सोसायटीचा कारभार सचिवांशिवाय ; दोन महिन्यांपासून सचिव नाहीत..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group