रात्रभर जागून कारवाई आणि वरिष्ठांकडून तडजोड?
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
सांगली:- अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणात तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी पकडून आणलेल्या वाहनांवर शासकीय निर्देशानुसार कारवाई होणे अपेक्षित असताना सर्व निर्देश फाट्यावर मारून नाममात्र (दाखवण्यासाठी) कारवाई केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर गोपनीय खबऱ्याने याबाबत सडेतोड वृत्तांकन केले आणि खळबळ उडाली तर महसूल कर्मचाऱ्यांमध्ये रोषाच वातावरण तयार झालं आहे. आम्ही रात्रभर जागून कारवाई करायची आणि कार्यालयात तडजोड केली जाते की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर आता या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
पलूस तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करीत असताना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी काही वाहने पकडून संबंधित वाहने वाहतूक करीत असलेले गौण खनिज अवैध आहे याची खातरजमा करून तहसील कार्यालयात आणून लावली होती. मात्र पुढील कारवाई शासकीय निर्देशानुसार दंड वसूल करून होणे अपेक्षित असताना अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांच्या सोयीनुसार दंड आकारणी करून कारवाई करून सोडली गेल्याचं कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. याबाबत खबऱ्याने सडेतोड वृत्तांकन केल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आणि आता महसूल कर्मचाऱ्यांमध्ये रोषाच वातावरण तयार झालं आहे.
अशा कारवाया फक्त पलूस नव्हे तर इतर तालुक्यात ही झाल्या असाव्यात अशी शंका व्यक्त केली जात आहे. अवैध गौण खनिज उपसा अथवा वाहतूक प्रकरणात स्थानिक कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाते म्हणून तलाठी मंडळ अधिकारी रात्रभर जागून कारवाई करतात आणि प्रत्यक्षात शासकीय निर्देशा नुसार कारवाई न होता निर्देश फाट्यावर मारले जातात हे समजल्यानंतर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमध्ये रोषाच वातावरण तयार झालं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.