सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /भाजपबरोबर सत्ता स्थापन केली होती ते बरोबर आहे असं अजित पवार यांना पण आता वाटत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे. सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण आहे; अशी अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सांगली येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. राष्ट्रवादीचा स्थानिक कार्यकत्र्याला काही मिळत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही मिळत नाही; असेही बावनकुळे म्हणाले. भास्कर जाधव यांनी फालतू धंदे करू नये. विरोधकांनी कपटकारण करवून सत्ता मिळवली होती. आत्ता विरोधात म्हणून विरोधकांची भूमिका बजावा; असा निशाणा देखील त्यांनी साधला.

