मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/ कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भू विकास बँकेची 968 कोटींची थकबाकी माफ होणार आहे. मिरज तालुक्यातील मालगाव च्या 45 कोटी सह सांगली जिल्ह्यातील 133 कोटींचे थकबाकी माफ होणार आहे. त्यामुळे आज मालगावच्या ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये भूविकास बँकेच्या शाखा होत्या. विविध कर्जापोटी 968 कोटींची थकबाकी होती. ही थकबाकी माफ व्हावी यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुढाकार घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही थकबाकी माफ करण्याची घोषणा केली. त्याचा फायदा सांगली जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे मालगाव येथील प्रकाश पाणीपुरवठा योजनेची 43 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. शिवाय मालगाव मधील इतरही शेती व्यवसायाचे सुमारे दोन कोटीहून अधिकची रक्कम माफ होणार आहे. त्यामुळे आज पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मालगावच्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती काकासाहेब धामणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण राजमाने, मालगाव चे माजी उपसरपंच शशिकांत कनवाडे, ग्रामपंचायत सदस्य विजय आवटी विश्वास खांडेकर, शेतकरी संघटनेचे संजय खोलकुंबे, डॉ गाताडे, महेश कोकणे, गंगाधर येलपरटे उपस्थित होते.