कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करांकडून दिवाळी साठी काही लोकांनी उचल घेतल्याचे खात्रीलायक वृत्त खबऱ्याला मिळाले होते याबाबत खबऱ्याने ही सडेतोड लिखाण केले होते मात्र या लिखाणाने उचल घेणाऱ्यांना मात्र मिरची झोंबली आहे. ही गोष्ट खबऱ्याला कशी काय समजली याबाबत आता संबंधितांकडून उलट तपासणी सुरू झाल्याने नेमकं खबऱ्याने वर्मावर बोट ठेवले आहे की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
दिवाळीच्या कालावधी मध्ये येरळा नदीला भरपूर पाणी होते त्यामुळे तस्करांना वाळू उपसा करता येत नव्हता मात्र दिवाळी असल्याने काही प्रशासकीय लोकांनी वाळू तस्करांकडून उचली घेतल्याचे खात्रीलायक वृत्त खबऱ्याच्या हाती लागल्यानंतर त्यावर खबऱ्याने ही सडेतोड लिखाण केले होते. या वृत्ता नंतर मात्र खळबळ माजली आणि उचली घेणाऱ्याना मात्र मिरची झोंबली. ही गोपनीय माहिती गोपनीय खबऱ्याला कशी काय समजली याबाबत उलट तपासणीची चर्चा सुरू झाली असून आदळआपट ही सुरू झाली आहे.
खबऱ्याच्या वृत्तानंतर प्रांताधिकारी एक्शन मोडवर
कडेगाव तालुक्यातील वाळू तस्करांना महसूल प्रशासनाने फ्री हॅन्ड दिला आहे की काय ? असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली होती, कारण शनिवारी भरारी पथक गायब होते तर बहुतांशी मुख्यालयात ही कोणीच नव्हते. खबऱ्याने वृत्तांकन केल्यानंतर प्रांताधिकारी गणेश मरकड एक्शन मोड वर आल्याचे पाहायला मिळाले. रविवारी रात्री तलाठी रात्रभर भरारी पथकाचे काम चोखपणे बजावताना दिसल्याचे शेतकऱ्यांनी खबऱ्याला सांगितले.