खबऱ्या प्रतिनिधी/ महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील असलेले मोठे शहर म्हणून मिरज परिचित आहे. या शहराला वाहतुकीच्या दृष्टीने शिस्त लावणी खूपच गरजेचे आहे . अशा परिस्थितीत आज वाहतूक शाखेला पुन्हा एकदा नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. सांगली जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या तातडीने आज तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या, असा आदेश सांगली जिल्हा पोलीस प्रमुख श्री दीक्षित कुमार गेडाम यांनी आज सकाळी काढला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. आज त्यांची मिरज वाहतूक शाखा येथे बदली करण्यात आली, तर मिरज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने यांची जिल्हा विशेष शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे .आज सायंकाळी साडेपाच वाजता पालवे यांनी माने यांच्याकडून मिरज वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारला.