विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट समाना रंगलेला पहायला मिळाला. त्यावरून टोकाचे राजकारण सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
अशातच फडणवीस यांनी शिर्डीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडामोडींच्या संदर्भाने ते म्हणाले, ‘राजकारण गेलं चुलीत.
मात्र, येथील गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. मात्र, त्यालाच बट्टा लागतोय. ही अवस्था महाराष्ट्राने कधीही पाहिली नव्हती.’ शनिवारी शिर्डी विमानतळावर आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.