प्रतिष्ठानच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क असल्याचा फायदा होईल
कडेगाव:- सध्या सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण ही जाहीर झाल आहे. कडेगाव तालुक्यातील नेवरी पंचायत समिती गण सध्या खुला पडला असून या ठिकाणी इच्छुकांनी कंबर कसली आहे. काँग्रेस आणि भाजप मध्ये प्रमुख लढत होणार आहे तर राष्ट्रवादी सुद्धा आपलं नशीब अजमावेल असं स्पष्ट पणे दिसू लागलं आहे.स्वराज्य योध्दा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मनोज शिवाजीराव महाडीक यांनी रणांगणात उतरावे अशी त्यांच्या सहकारी मित्र व कार्यकर्त्यांची ईच्छा असून प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाढवलेला जनसंपर्क याठिकाणी फायदेशीर ठरेल असं बोललं जातं आहे.
नेवरी पंचायत गणामध्ये नेवरी आणि खेराडे वांगी ही गावे जास्त मतदान असणारी गावे आहेत. त्यामुळं नेते मंडळी उमेदवार निवडताना या गावांना प्राधान्य देणार हे स्पष्ट आहे. आजपर्यंत नेवरी मधूनच उमेदवारी मिळाली आहे.मनोज महाडीक हे नेवरीचे स्थायिक असून एक शिक्षित अभ्यासू नेतृत्व आणि तालुक्यातील त्यांचे असलेले संघटन हे वाख्यानेजोगे आहे, आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या जनसंख संघटनेच्या असलेल्या आपुलकीच्या भावनेने त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची ईच्छा त्यांनी पंचायत लढावी अशी आहे ! आटपाडी,सांगली ते कराड पर्यन्त संघटनेचा असलेला संपर्क मनोज महाडीक याना कितपत कामी येतो ही येणारी आगामी निवडणूक ठरवेल !
तालुक्यात गाव तिथे शिवजयंती साजरे करण्याचे त्यांचे कार्य असो, किंवा गडकोट मोहीम असो, सामाजिक कार्य असो की प्रशासकीय कार्य असो नेहमी तत्परतेने प्रतिसाद देणारे कार्यकर्तृत्व म्हणून त्यांचा आदर्श कडेगाव तालुक्यात आहे.
नेवरीसोबत त्यांचा बालेकिल्ला म्हणून कडेपुर, तडसर ची ओळख तालुक्यात आहे, गावासोबत गावाबाहेर असंख्य मित्रसमुदाय जोडण्याच कार्य त्यांनी गेल्या काही वर्षांत संघटनेच्या माध्यमातून केलं आहे,त्यामुळं त्यांनी यावेळी निवडणूक लढवावी अशी मागणी सहकारी मित्र व कार्यकर्त्यांकडून होत आहे.


