• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अंगावर काळी साडी अन हातात सूप..! सांगलीत अवतरली भुताची आई ‘तडकडताई’..

Admin by Admin
June 29, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
अंगावर काळी साडी अन हातात सूप..! सांगलीत अवतरली भुताची आई ‘तडकडताई’..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sangli News Updates : सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत आणि पळण्याची लगबग पसरली आहे. त्याचं कारण आहे भुताची आई असलेली तडकडताई. ज्येष्ठ महिन्यात आषाडीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी महिशासूर मर्दिनी ‘तडकडताई’ वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते.

अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी ही ‘तडकडताई’ म्हणजे सांगलीची जुनी परंपरा.

ज्येष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरुवात होते. ‘तडकडताई, भुताची आई’ असा गजर करत लहान मुले या ‘तडकडताई’चे स्वागत करतात. कुंभार घराण्याकडे ‘तडकडताई’ चा हा मान असतो. ही परंपरा गेल्या 250 वर्षापासून सांगलीत सुरू आहे. कर्नाटक मधील बदामी येथून 7 वाट्या मानव लोकांनी पळवून आणल्या होत्या. त्यातली वाटी एक सांगली, आष्टा, कासेगाव, पलूस, कवठे पिरान अश्या ठिकाणी आल्या आहेत. त्यावेळी पासून ही प्रथा सुरू आहे.

दैत्य लोक त्यावेळी मानवाला त्रास करत होते, त्यावेळी चौडेश्वर देवी वाट्याच्या रुपात या गांवामध्ये आली आणि मानवाच्या संरक्षण करण्यासाठी हा अवतार घेत असते. सांगली शहरात जोगण्या उत्सव हा ज्येष्ठ अमावास्येला संध्याकाळी 7 वाजता सुरु होतो. काळी साडी हातात सूप आणी चेहऱ्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तडकडताईच्या लग्नाची वरात काढण्यात येते.

कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी 6 वाजता या तडकडताई च्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजार असतात. सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या हातातील सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला कि मुलांवरील इडा पिडा टळते अशी आख्यायिका आहे.

अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते. तडकडताईचा दरारा हा खूप मोठा असतो. अनेक लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तड्कडताईला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरु असलेली ही परंपरा आता 21 व्या शतकातही जपली जात आहे.

Previous Post

यवतमाळ अमृतची पाईप लाईन चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

मोठी बातमी | उद्धव ठाकरेंचा राजीनामा, महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | उद्धव ठाकरेंचा राजीनामा, महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ..

मोठी बातमी | उद्धव ठाकरेंचा राजीनामा, महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group