मुंबई-खबऱ्या प्रतिनिधी : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे एकेकाळचे जिवलग मित्र पण नंतर त्यांच्यात टोकाचे वितुष्ट आले. एवढे की राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव व्हावा म्हणून सदाभाऊ खोत यांनी रात्रीचा दिवस केला,तर राजू शेट्टी नेहमीच बोलताना सदाभाऊ खोत यांची लायकी लढतात.असे दोन राजकीय वैरी एका मुद्यावर मात्र एकत्र आले आहेत. दोघांनाही एका गोष्टीचा आनंद झाला आहे. राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयाने दोन्ही नेते खुश झाले आहेत.
राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव करून धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.त्यांचा विजय झाल्यावर सदाभाऊ खोत यांनी मुबंईत तर राजू शेट्टी यांनी प्रवासादरम्यान त्यांचा सत्कार केलाय.
सदाभाऊ खोत यांचा मित्र तो शेट्टी यांचा शत्रू तर शेट्टी यांचा मित्र खोत यांचा शत्रू असे समीकरण बनले होते मात्र धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर दोन्ही नेते मात्र एका मुद्यावर ठाम झाले आहेत.

