सांगली -खबऱ्या प्रतिनिधी / महाराष्ट्रातील ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषद आता आरक्षणासाठी आक्रमक झाली आहे. राजकीय, शैक्षणीक, आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
शनिवारी २६ मार्च रोजी, सांगली मधील स्टेशन चौकात आरक्षणा संदर्भात एल्गार मेळावा घेण्यात आला आहे. विविध आरक्षण, राजकीय आरक्षण , यासाठी सहकार पंढरी म्हणून सांगलीतून सुरूवात करीत आहोत, आपण सर्वांनी यायला पाहिजे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
मंत्री असून सुद्धा महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून विजय वडेट्टीवार साहेब केंद्र आणि राज्य सरकारच्याही विरोधात ओबीसी आरक्षणासाठी लढत आहेत. मुलांच्या भविष्यासाठी, नोकऱ्या आणि शिक्षणाच्या बाबतीत मिळणाऱ्या आरक्षणासाठी ही चळवळ आपण सर्व समाज बांधवांनी मिळून जोरात केली पाहिजे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषद सांगली च्या वतीने संजय बापू विभूते यांनी केले आहे.