• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Maratha Reservation : महायुती सरकारचा आरक्षणाबाबत मोठा निर्णय ! ‘या’ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Admin by Admin
August 22, 2025
in सामाजिक
1 min read
0
Maratha Reservation : महायुती सरकारचा आरक्षणाबाबत मोठा निर्णय ! ‘या’ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी एका मराठा नेत्याचीच नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा दिला असताना, सरकारने या मुद्द्यावर तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने यापूर्वी एक उपसमिती स्थापन केली होती. ही समिती मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेते. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियुक्ती केल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपसमितीच्या जबाबदाऱ्या काय आहेत?

  1. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय साधणे.
  2. न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी नियुक्त समुपदेशकांशी समन्वय ठेवणे आणि त्यांना सूचना देणे.
  3. न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे.
  4. न्या. संदीप शिंदे समितीशी समन्वय साधणे.
  5. मराठा आंदोलन आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणे.
  6. जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून प्रक्रिया सुलभ करणे
  7. मराठा समाजासाठीच्या योजनांचा, तसेच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेणे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनापूर्वीच सरकारने उपसमितीच्या पुनर्गठनाला गती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

उल्हासनगर गुन्हे शाखेचा नशेच्या सौदागरांना दणका; ३२ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

Next Post

मोठी ब्रेकिंग | शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

मोठी ब्रेकिंग | शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group