राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे काल बाळा नांदगावकरांनी सांगितले होते.
काल राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तसेच राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे नांदगावकरांनी सांगितले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र सुरक्षित आहे, इथे कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, आणि जर लागत असेल तर ठाकरे सरकारकडून सुरक्षा दिली जाईल, महाराष्ट्रातील नेत्याला हात लावायची कुणाची हिंमत नाही, शिवसेना भवनात असे धमकीचे पत्र रोज येतात, त्यामुळे ही स्टंटबाजी सोडून द्या, असं संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

