
सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती दि. २४ एप्रिल रोजीचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. या पर्यटकांशी संपर्क झालेला असून सर्व ३० पर्यटक सुरक्षित असल्याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
या पर्यटकामध्ये सांगली शहरातील १०, कडेगाव मधील ५, पलूसमधील ८ तर मिरजमधील ७ असे एकूण ३० नागरिक आहेत. यामध्ये सांगली शहरातील प्रतापसिंह राजपूत, ज्योती राजपूत, संतोष जगदाळे, वर्षा जगदाळे, अन्नपूर्णा भोसले, निशांद भोसले, रितेश जाधव, मनीषा जाधव, अलका जाधव व रिया जाधव, कडेगाव तालुक्यातील येडे येथील रामदास बाबर, सुर्यकांत कदम, दिपक अभंग, आप्पाजी सरगर व रामचंद्र जाधव, पलूस तालुक्यातील कुंडल येथील अविनाश लाड, शोभा लाड, वैभव लाड, संगीता लाड, विकास लाड, दिपाली विकास लाड, नितीन लाड व दिपाली नितीन लाड, मिरज शहरातील प्रमोद जगताप, वंदना जगताप, स्वरांजली जगताप, प्रांजली जगताप, विराज जगताप, फुलचंद शिंदे व हेमलता शिंदे यांचा समावेश आहे.