सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने नागरिकांच्या घरपट्टीत तिप्पट वाढ केली आहे. ही अन्यायकारक करवाढ रद्द करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
ते म्हणाले, अन्यायकारक घरपट्टीवाढीमध्ये शासनाने लक्ष घालावे. या दरवाढीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. सन 2003 मध्ये याच पद्धतीने कोणत्याही निकषाशिवाय घरपट्टी वाढ केली होती. महासभेची मान्यता न घेताच ही घरपट्टीवाढ केलेली आहे. त्याला स्थगिती देण्यात यावी, तसेच संबंधितांची बैठक घ्यावी.

