मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – मिरज शहरातील महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे विवाहित महिलेस छळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘माहेरहून १० लाख रुपये घेऊन ये’ असे म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ करण्यात आल्याचे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
“माहेरहून १० लाख रुपये घेवुन ये नाहीतर तलाक दें’ या कारणावरुन पती इम्रान मिरासाहेब मुल्ला, दीर तौफिक मिरासाहेब मुल्ला, सासु दिलसादबी मिरासाहेब मुल्ला, व सासरे मिरासाहेब बाबालाल मुल्ला सर्व रा. सुंदरनगर मिरज. यांच्यासहित नणंद आयेशा रिझवान मुत्तयन्वी, (मुजावर गल्ली ) व आफसाना असिफ जमादार ,(मळणगाव ता. कवठेमंहकाळ) यांनी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली असल्याची तक्रार पिडीतेने महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे दिली आहे.
पती, दिर सासू ,सासरा, नणंदा असे सहा जणांच्या विरोधात कौटुंबिक छळ, जिवे मारण्याची धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी महात्मा गांधी चौकीचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.