सांगली/प्रतिनिधी: बेडग येथील स्वागत कमान पाडल्या प्रकरणी सरपंच उमेश शंकराव पाटील आणि उपसरपंच मल्हारी उर्फ संभाजी आप्पासाहेब नागरगोजे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना सांगली जिल्हा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲड. प्रतीक जाधव यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. यावेळी ॲड. प्रकाश जाधव व ॲड. प्रतीक जाधव यांनी त्यांची बाजू मांडली.
त्यामुळे न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेडग येथील स्वागत कमान पडल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यावेळी गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुन्हे मागे घेण्यासाठी मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी आंबेडकरी समुदाय व गावातील ग्रामस्थांची जिल्हा परिषदेत सुनावणी आयोजित केली होती. दोन्ही गटाची बाजू प्रशासनाने ऐकून घेतली. तसेच गुरुवारी (ता. १०) रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.

