• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जातीपातीचे राजकारण शरद पवारांमुळेच महाराष्ट्रात सुरू – राज ठाकरे

Admin by Admin
April 2, 2022
in माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
जातीपातीचे राजकारण शरद पवारांमुळेच महाराष्ट्रात सुरू – राज ठाकरे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोक जातीपातीच्या मुद्द्यावर एकमेकांविरोधात उभ रहावेत ही गोष्ट काही लोकांना हवी आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना एनसीपीला ही गोष्ट हवी आहे. जेव्हा महाराष्ट्रात १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासूनच जातीपातीच राजकारण मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू झाले, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतिर्थावर केला.

जातीच्या निमित्ताने महाराष्ट्रात एकमेकांची भडकवायची कामे सुरू झाली.

महाराष्ट्रात एकेकाळी जातीचा अभिमान होता. पण जातीत फूट पाडायची सुरूवात ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर झाली. दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे आणि फूट पाडत राहणे याची सुरूवात राष्ट्रवादीने केली.

निवडणुकींच्या तोंडावर पैशाचा चारा टाकायचा आणि सत्ता मिळवायची असाच प्रकार सुरू झाला. आम्ही एकमेकांची डोकी फोडायला तयार झालो आहोत. आम्ही जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत ? हिंदु म्हणून आपण कधी एक होणार आहोत असाही सवाल त्यांनी केला.

मराठी माणसांनाच पहिल्यांदा नोकरीत प्राधान्यात हवे

महाराष्ट्रात आज सगळीकडे बोंबाबोंब आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटक नाहीत, पोलीसांची दुर्दैवी अवस्था आहे, शेतकरी आत्महत्या थांबत नाही, शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. दुसरीकडे सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात येते. पण महाराष्ट्रात सर्वाधिक एसएससी बोर्डाचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मराठी माणसांना पहिल्यांदा प्राधान्य मिळायला हव, फालतु लफडी इकडे आणू नका असाही सज्जड दम त्यांनी दिला.

सगळ्यांच ओझ घ्यायला महाराष्ट्र बसलेला नाही

उत्तर प्रदेश निकाल पाहिल्यानंतर तिथे विकास होतोय हे दिसले. हेच मलाही पाहिजे होते. जेव्हा २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सत्तेत आले तेव्हा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तीन राज्याचा विकास करा, त्यांना त्यांच्या राज्यात रोजगार मिळुदेत अस मी बोललो होतो. आनंदाची गोष्ट आहे की तिथे चांगल होतय. सगळ्यांच ओझ घ्यायला महाराष्ट्र बसलेला नाही असाही टोला त्यांनी लगावला.

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हव होत ना ?

मुख्यमंत्री पद महाराष्ट्राच जनतेच आहे. ती गोष्ट चार भिंतीत का केली असाही सवाल राज ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री पदासाठी जे अडीच वर्षाच राजकारण केले समोरची व्यक्तीही आता राजकारण करत आहे हे लक्षात घ्या, असेही राज ठाकरे म्हणाले. जेव्हा कुटुंबावर गोष्टी येतात तेव्हा आता चिडायची काय गरज आहे ? ईडीने मलाही नोटीस पाठवली होती. पण मी गेलोच ना नोटीशीला उत्तर द्यायला. मग यशवंत जाधव यांना चार महिने नोटीस येऊनही ईडी संपत्ती अटॅच करते तेव्हा मुख्यमंत्र्यांना इतक चिडायची काय गरज आहे ? असाही सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या घरच्यांनी पालिकेत जाऊ नये असाही सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

मतदारांना मेंढरासारखी वागणूक

राज्याच्या गृहमंत्री १०० कोटींच्या खंडणी वसुलीच्या आरोपाखाली जेलमध्ये जातो. दाऊदशी संबंध असलेले नवाब मलिक हे जेलमध्ये जातात. अडीच वर्षे जेलमध्ये असलेले छगन भुजबळ हे शिवतिर्थावर मंत्रीपदाची शपथ घेतात. तुमच्या नाकावर टिचून सत्ते येऊन या सगळ्या गोष्टी करतात. आपण मात्र रांगेत लाचारासारख रांगेत उभ रहायच. राजकारणी लोक आपल्याला मेंढरासारखे वापरत आहेत. आमच्या हातात राज्य द्या, आम्ही वाटेल ते करू असाच प्रकार सुरू असल्याची टीका राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली

Previous Post

‘ साला पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणाबरोबर केलं.?’ उद्धव ठाकरेंच्या जुगाडावर राज ठाकरेंचं थेट बोट..

Next Post

कोल्हापूर-मिरज, सांगली मार्गावरील ‘पॅसेंजर’ दि. १५ एप्रिलपासून पुन्हा धावणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापूर-मिरज, सांगली मार्गावरील ‘पॅसेंजर’ दि. १५ एप्रिलपासून पुन्हा धावणार

कोल्हापूर-मिरज, सांगली मार्गावरील 'पॅसेंजर' दि. १५ एप्रिलपासून पुन्हा धावणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group