मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर तसेच कोल्हापूरचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले आहे.
शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा, तर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद दिले जाणार, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात पुण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री पुढीलप्रमाणे – सुरेश खाडे (सांगली), राधाकृष्ण विखे-पाटील (अहमदनगर व सोलापूर), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर व गोंदिया), चंद्रकांत पाटील (पुणे), विजयकुमार गावित (नंदुरबार), गिरीश महाजन (धुळे, लातूर व नांदेड), गुलाबराव पाटील (बुलडाणा), दादा भुसे (नाशिक), संजय राठोड (यवतमाळ व वाशिम), संदीपान भुमरे (औरंगाबाद), उदय सामंत (रत्नागिरी व रायगड), तानाजी सावंत (परभणी व उस्मानाबाद), रवींद्र चव्हाण (पालघर व सिंधुदुर्ग), अब्दुल सत्तार (हिंगोली), अतुल सावे (जालना व बीड), शंभूराज देसाई (सातारा व ठाणे), मंगलप्रभात लोढा (मुंबई उपनगर).

