कडेगाव:- आपत्कालीन परिस्थिती मध्ये सामाजिक भान ठेऊन काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम नेवरी ता कडेगाव येथील महावितरण शाखा कार्यालयाने राबवला असून स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त विदुयत योद्धा म्हणून येथील दयेश कांबळे , महेश साळुंखे आणि सुनील मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
भिकवडी फाटा ता कडेगाव येथे ११ केव्ही विद्युत वाहक तार तुटून रस्त्यावर पडलेली पाहून नेवरी ता कडेगाव येथील दयेश कांबळे, महेश साळुंखे आणि सुनील मोरे यांनी परिस्थिती ची जाणीव ठेवत तात्काळ महावितरण च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विद्युत पुरवठा बंद करून घेतला. विदुयत पुरवठा बंद होईपर्यंत त्या जागीच थांबून रस्त्यावरील ये जा करणाऱ्या लोकांना थांबवून होणारा अपघात टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.तसेच विदुयत पुरवठा पूर्ववत होईपर्यंत महावितरण च्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे मोठी जीवितहानी टळली असल्याने देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज त्यांचा महावितरण शाखा कार्यालयात शाखा अभियंता नितीन शेवाळकर आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष विनायक (दादा) विभूते यांचे हस्ते विदुयत योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

